Search This Blog

Saturday, 8 April 2023

व्हॉट्सएप आगामी वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवरून फेसबुकवर स्टेटस अपडेट्स थेट शेअर करता येतील.


व्हॉट्सएप आगामी वैशिष्ट्यामुळे वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅपवरून फेसबुकवर स्टेटस अपडेट्स थेट शेअर करता येतील.

 


मेटा-मालकीचे व्हाट्सएप एक नवीन वैशिष्ट्य विकसित करत आहे जे वापरकर्त्यांना ऐप न सोडता त्यांचे स्टेटस अपडेट्स फेसबुक स्टोरीमध्ये शेअर करण्यास अनुमती देईल, WABetaInfo च्या अहवालानुसार. नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना प्रत्येक वेळी काहीतरी नवीन पोस्ट करताना मॅन्युअली शेअर न करता दोन्ही प्लॅटफॉर्मवर त्यांचे स्टेटस अपडेट शेअर करणे सोपे करेल.


पूर्वी, वापरकर्ते फेसबुक स्टोरीजवर स्टेटस अपडेट्स शेअर करू शकत होते, पण प्रत्येक वेळी त्यांनी काहीतरी नवीन पोस्ट केल्यावर मॅन्युअली अपडेट शेअर करण्याच्या अतिरिक्त टप्प्यातून जावे लागते. या नवीन वैशिष्ट्यासह, पर्याय सक्षम केल्यावर वापरकर्त्यांनी निवडलेल्या काही स्टेटस अपडेटसाठी प्रक्रिया स्वयंचलित होईल.


व्हॉट्सअॅपवरील स्टेटस प्रायव्हसी सेटिंगमध्ये नवीन पर्याय सापडेल आणि वापरकर्ते त्यांचे फेसबुक खाते जोडू शकतील. हा पर्याय पर्यायी असेल आणि डीफॉल्टनुसार अक्षम केला जाईल, याचा अर्थ वापरकर्त्यांना त्यांचे स्टेटस अपडेट्स फेसबुक स्टोरीजवर शेअर करायचे असल्यास ते स्वतःच सक्षम करावे लागतील.


हे नवीन वैशिष्ट्य वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप न सोडता फेसबुक स्टोरीजसह त्यांचे स्टेटस अपडेट मॅन्युअली शेअर करताना वेळ आणि मेहनत वाचवण्यास अनुमती देईल. हे फीचर अँड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही युजर्ससाठी उपलब्ध असेल.


याव्यतिरिक्त, WhatsApp "ऑडिओ चॅट्स" नावाच्या एका नवीन वैशिष्ट्यावर काम करत आहे, जे Android वर अनुप्रयोगाच्या भविष्यातील अपडेटमध्ये संभाषणांमध्ये उपलब्ध होईल. या वैशिष्ट्यामध्ये चॅट हेडरमध्ये नवीन वेव्हफॉर्म आयकॉन समाविष्ट असेल, जे वापरकर्त्यांना ऑडिओ चॅट्स सुरू करण्यास अनुमती देईल आणि चालू कॉल्स समाप्त करण्यासाठी लाल बटण असेल.


एकंदरीत, ही नवीन वैशिष्ट्ये आपल्या वापरकर्त्यांना त्याच्या प्लॅटफॉर्मवर सर्वोत्तम संभाव्य अनुभव प्रदान करण्यासाठी WhatsApp ची सतत वचनबद्धता दर्शवतात. नवीन वैशिष्ट्यासह जे वापरकर्त्यांना व्हॉट्सअॅप न सोडता त्यांचे स्टेटस अपडेट्स फेसबुक स्टोरीमध्ये शेअर करण्याची परवानगी देते, प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांसाठी त्यांच्या मित्र आणि कुटुंबाशी कनेक्ट राहणे अधिक सोपे करत आहे. त्याचप्रमाणे, नवीन ऑडिओ चॅट वैशिष्ट्य वापरकर्त्यांना अॅपमध्ये एकमेकांशी संवाद साधण्याचा आणखी एक मार्ग प्रदान करेल. ही वैशिष्‍ट्ये येत्या काही आठवडे आणि महिन्‍यांमध्‍ये आणली जात असल्‍याने, WhatsApp वापरकर्त्‍यांना त्‍यांच्‍या आवडीच्‍या लोकांशी संपर्कात राहण्‍याचे आणखी मार्ग पहाण्‍याची अपेक्षा आहे.

Wednesday, 29 March 2023

AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे भविष्य !!!

AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) चे भविष्य हा सध्या सुरू असलेल्या चर्चेचा आणि अनुमानांचा विषय आहे. येत्या काही वर्षांत AI आपल्या जगाला कसे विकसित करेल आणि आकार देईल हे सांगणे कठीण असले तरी, काही ट्रेंड आणि शक्यता आहेत ज्यांचा आपण विचार करू शकतो

मशीन लर्निंगमधील प्रगती: AI तंत्रज्ञान शिकण्याच्या आणि जुळवून घेण्याची क्षमता सुधारत राहील, ज्यामुळे नैसर्गिक भाषा प्रक्रिया, प्रतिमा ओळखणे आणि निर्णय घेणे यासारख्या क्षेत्रात प्रगती होऊ शकते.


ऑटोमेशन आणि जॉब डिस्प्लेसमेंट: एआय सिस्टीम अधिक अत्याधुनिक झाल्यामुळे विविध उद्योगांमध्ये अनेक नोकऱ्या बदलण्याची ऑटोमेशनची क्षमता आहे. यामुळे नोकरीचे विस्थापन होऊ शकते आणि पुन्हा प्रशिक्षण आणि पुन: कौशल्याची गरज निर्माण होऊ शकते.

नैतिक विचार: AI तंत्रज्ञान जसजसे पुढे जाईल, तसतसे पूर्वाग्रह, गोपनीयता आणि डेटा सुरक्षा यासारख्या नैतिक आणि सामाजिक परिणामांचा काळजीपूर्वक विचार करण्याची आवश्यकता असेल.

मानव आणि AI यांच्यातील सहयोग: मानवांची जागा घेण्याऐवजी, AI तंत्रज्ञानाचा वापर मानवी निर्णयक्षमता आणि समस्या सोडवणे वाढविण्यासाठी आणि मदत करण्यासाठी केला जाऊ शकतो, ज्यामुळे अधिक कार्यक्षमता आणि नवीनता येते.

नवीन ऍप्लिकेशन्स आणि शक्यता: एआय तंत्रज्ञान विकसित होत असताना, आरोग्यसेवा, शिक्षण आणि वाहतूक यासारख्या क्षेत्रात नवीन आणि नाविन्यपूर्ण ऍप्लिकेशन्सची क्षमता आहे.

एकंदरीत, AI चे भविष्य तांत्रिक, सामाजिक आणि नैतिक घटकांच्या जटिल परस्परसंवादावर अवलंबून असेल. AI च्या सतत विकासाशी निगडीत दोन्ही शक्यता आणि आव्हाने असली तरी, या तंत्रज्ञानाचा काळजीपूर्वक विचार करून आणि नैतिक आणि जबाबदार वापरासाठी वचनबद्धतेने संपर्क साधणे महत्त्वाचे आहे.

Thursday, 23 October 2014

!! अस्तंबा (अस्वस्थामा) ऋषींची यात्रा !!

           !! अस्तंबा (अस्वस्थामा) ऋषींची यात्रा !! 



 
 तळोदा :कधी खोल दरी, पाय थोडाही घसरला तरी जीव गेल्याशिवाय राहणार नाही, असा हा खडतर रस्ता आहे. अर्थात याही परिस्थितीत हजारो भाविक मोठय़ा श्रद्धेने अश्‍वत्थामाच्या दर्शनाला येत असतात.मध्य प्रदेश आणि गुजरातमधील भाविकही पायपीट करून या यात्रेला येतात. वर शिखरावर पोहोचल्यानंतर त्याठिकाणी अश्‍वत्थामाची प्रतिकृती म्हणून एक दगड आहे.तेथे मोठय़ा श्रद्धेने लोक याठिकाणी नवस करून नारळ फोडतात व पूजाअर्चा करतात. त्यानंतर पुन्हा परतीच्या मार्गाला लागतात. या शिखरावर अतिशय कमी जागा असली तरी तेथे प्रत्येकाला बसायला जागा मिळते. हा अश्‍वत्थामाचा चमत्कार असल्याचे लोक सांगतात. या शिखरावरून सृष्टीच्या खर्‍या सौंदर्याचे दर्शन घडते. येथून दिसणारा सूर्योदय तसेच तापीचे विहंगम दृश्य डोळ्याचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही. याठिकाणी जाण्याचा व परतीचा मार्ग वेगळा आहे. शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या सातपुड्यातील अस्तंबा यात्रोत्सवास धनत्रयोदशीच्या दिवशी सुरुवात होते. सातपुड्यातील पर्वत रांगेतील तिसर्‍या पर्वतावर अस्तंबा ऋषींचा यात्रोत्सव भरतो. या यात्रोत्सवासाठी भाविक धनत्रयोदशीच्या आदल्या दिवसापासून दाखल होतात. ही यात्रा तळोदा शहरापासून सुरू होते.सातपुडयातील उंच डोंगर....



दोन्ही बाजुला असलेल्या हजारो फुट खोल दरी....
नागमोडी खडतर रस्ता..
अन शिखरावर असलेले अस्तंबा ऋषीचे विश्राम स्थान.अस्तंबा ऋषीच्या दर्शनाची ओढ़ घेवुन घोषणा करीत भाविक हजारो फुट शिखर सहज चढतात.  निसर्गरम्य वातावरणात वसलेल्या अस्तंबा ऋषीच्या यात्रेचे भाविकांना आकर्षण असते. म्हणुनच या यात्रेला येणा-या भाविकांची संख्या वर्षानवर्ष वाढत आहे. समुद्र सपाटीपासुन ४ हजार फुट उंच शिखरावर अस्तंबा ऋषीचे देवस्थान आहे. भाविकांची अपार श्रधा असल्याने हाती भगवा झेंडा घेत `अस्तंबा ऋषी महराज की जय ' चा जयघोष करीत भाविक पदयात्रेने हजेरी लावतात. दिवाळीच्या पर्वावर धनत्रयोदशीला यात्रोत्सवाला प्रांरभ होत असते. शापस्थ अवस्थेत जखमांनी विव्हळणारा अश्वस्थामा आपल्या जखमांसाठी सातपुडयाचा द-याखो-यात तेल मागतो. आजही शिखरावर जाणा-या यात्रेकरूंणा तो भेटतो व वेळप्रसंगी रस्ताहीन झालेल्या यात्रेकरूंना मार्गदर्शन करतो, अशी अस्तंबा ऋषीचे दंतकथा आहे. अश्वस्थामा यांचा महाभारतात उल्लेख असला तरी त्यांचे स्थान भारतात कुठेही आढळत नाही. मात्र अश्वस्थामा ( अस्तंबा ) उल्लेख सातपुडयाच्या कुशिमधे उंच शिखरावर असल्याचे दिसुन येते. दिवाळीच्या पर्वाला अस्तंबा ऋषीच्या यात्रेला प्रारंभ होतो. तळोदा येथुन एक दिवस अगोदरच कॉलेज रोडपासुन वाजत-गाजत मिरवणुकीने मंदिराचे दर्शन घेवुन यात्रेकरू अस्तंबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात.

कोठार, देवनदी, असली, नकट्यादेव, जूना अस्तंभा, भिमकुंड्या या मार्गाने अस्तंबा ऋषी यात्रेला जातात. रानटी श्वापदांना दूर ठेवण्यासाठी ढोल, आगीसाठी टायर, दिवट्या, टेंभे,मशाली अशा दिर्घकाळ जळणार्या वस्तू या यात्रेत घेतल्या जातात. रात्रीचा प्रवास करुण अस्तंबा ऋषीच्या शिखरावर जाऊन धनत्रयोदशीला पहाटेच्या सुमारास दर्शन घेवुन ध्वज लावतात. सुमारे तीन दिवस ही यात्रा पूर्ण केली जाते. एकवेळा, पाच वेळा, अकरा वेळा यात्रा करण्याचा नवस बोलला जातो. चिरंजीव अश्वथामा पुजण्यामागे केवळ एक श्रध्दा आहे. त्याच्यासारखे दिर्घायुष्य मिळावे यासाठीच कदाचित ही यात्रा असते असा जाणकारांचा अंदाज आहे. त्यानंतर आदिवासी बांधव तळोदा येथे एकत्रित येवुन ढोल ताश्याचा गजरात भव्य मिरवणुक काढतात. त्यानंतर नंदुरबार तालुक्यातील नाशिंदे येथील पावबा ऋषीच्या यात्रेसाठी रवाना होतात. या पदयात्रेदरम्यान डफच्या तालावर ठेका घेत `अस्तंबा ऋषी की जय ', `पावबा ऋषी की जय' असा जयघोष करुण नृत्य करतात. त्यानंतर पदयात्रा पुर्ण करुन परतीच्या प्रवास करीत घरी परततात. हे भाविक यात्रोत्सवात सुरुवात करताना गोर्‍यामाळ, चत्र्यादेव अशा टेकड्या पार करीत शेवटी अस्तंबा ऋषींचे दर्शन घेऊन तेथून नकट्यादेव, जुना अस्तंबा मार्गे मामा-भाचा टेकडी, देवनदी व चांदसैली घाट मार्गे कोठार येथून परत येत असतात.
 हे सर्व भाविक दिवाळीच्या आदल्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघतात. अस्तंबा ऋषींचा यात्रोत्सव भाविक दिवाळीच्या दिवशी सांगता करीत असल्याने सर्व भाविक शहराजवळील शेतमळ्यावर मुक्कामाला थांबले आहेत. तेथून तळोदा महाविद्यालयापासून वाजत-गाजत मिरवणुकीने शहरातील हनुमान मंदिराचे दर्शन घेतात.भाविकांचे मोठमोठे जत्थे दाखल होतात हे दृश्य तळोदा शहरात पाहायला मिळतात. तळोद्याजवळ मुक्काम करतात.

!! अस्तंबा (अस्वस्थामा) ऋषींचा काही इतिहास !!

कौरव आणि पांडवांचे गुरु द्रोणाचार्यांचा पुत्र आणि सप्तचिरंजीवांपैकी एक. याच्या कपाळी जन्मापासूनच एक मणी असतो. अर्जुनाइतकाच शस्त्र आणि अस्त्र विद्येत पारंगत. द्रोणाचार्यांनी कौरवांचे सेनापतीपद स्वीकारल्यानंतर पांडवसेनेवर त्यांनी तिखट हल्ला चालू केला. पांडवांची बाजू मार खावू लागली. द्रोणाचार्य यांचा आपल्या मुलात अतिशय जीव आहे हे श्रीकृष्णाला ठावूक असते. अश्वत्थामा मेला असे जर द्रोणाचार्यांना पटवून देता आले तर ते दिग:मूढ होतील आणि युद्ध करण्याची इच्छा त्यांना राहणार नाही. द्रोणाचार्यांना शस्त्र खाली ठेवायला लावायचा हाच एक उपाय आहे हे कृष्णाने युधिष्ठिराला पटवून दिले. तेंव्हा भीमाद्वारे अश्वत्थामा नावाच्या एका हत्तीचा वध घडवून कृष्णाने 'अश्वत्थामा मेला' अशी अवई उठवली. रणधुमाळीत सत्य कोण सांगेल असा प्रश्न त्यांना पडला. तेंव्हा सर्वात विश्वसनीय सत्यवादी मनुष्य म्हणून युधिष्ठिराला विचारले की खरच अश्वत्थामा मेला काय? परंतु कृष्णाच्या सांगण्यावरून युधिष्ठिराने 'नरो वा कुंजरो वा' असे उत्तर दिले. या धक्क्याने द्रोणाचार्यांनी शस्त्र खाली ठेवले. दृष्टूद्युमनाने याचा फायदा उचलत त्यांचा वध केला. पुढे अश्वत्थाम्याने त्याचा वध करत याचा बदला घेतला. अश्वत्थम्याने महाभारत युद्धात कौरावांचा शेवटचा सेनापती म्हणून काम पहिले. युद्धं संपल्यावर आणि दुर्योधन मृत्यूपन्थास लागला असतांना अश्वत्थाम्याने त्याला "पांडवांची शिरे कापून आणतो" असे आश्वासन दिले. परंतु अंधारात पाच पांडवपुत्रांचीच मुंडकी तो कापून आणतो. यावर संतप्त पाण्डव त्याला शोधत येतात. अर्जुन व अश्वत्थामा दोघे एकमेकांवर ब्रम्हास्त्र फेकतात. यामुळे सृष्टीचा विनाश होऊ नये म्हणून कृष्ण दोघांना आपापले ब्रम्हास्त्र परत घ्यायला सांगतो. परंतु अश्वत्थाम्याला अस्त्र परत घेण्याची कला माहीत नसल्यामुळे तो अभिमन्युची पत्नी उत्तरेच्या गर्भात ते सोडतो. यावर क्रोधित होऊन कृष्ण त्याच्या कपाळावरचा दिव्य मणी काढून घेतो आणि त्याला शाप देतो की कल्पकल्पांतपर्यंत तू ही जखम कपाळी घेऊन दारोदार या जखमेसाठी लोकांना तेल मागत फिरशील. आणि कपाळी जखम घेऊन आजही तो तेल मागत वणवण फिरतो असे मानल्या जाते.
अश्वथामा तेजस्वी आणि दिव्य शक्तींचा उपयोग करण्यात निपुण होता. शास्त्रामध्ये अश्वथामा अमर असल्याचे सांगण्यात आले आहे.

Friday, 9 May 2014

आता तुम्हाला कॉंम्प्युटरवर काम करत असताना मोबाईल वापरायची गरजच नाही


आता तुम्हाला कॉंम्प्युटरवर काम करत असताना मोबाईल वापरायची गरजच नाही. कारण लवकरच तुम्हाला कॉम्प्युटरमध्येही अॅण्ड्रॉईड अॅप वापरता येईल. या अॅपने मोबाईलवरील व्हॉट्स अॅप, गेम्स यासारखे अनेक अॅप्स कॉम्प्युटरमध्ये वापरता येतील. इंटेलने अशी प्रोसेसर सिस्टीम तयार केली आहे. ज्यामुळे आपण एकाचवेळी विंडोज आणि अॅण्ड्रॉईड वापरु शकतो. मात्र त्यासाठी तुम्हांला वेगळा कॉम्प्युटर घ्यायची गरज नाही. कारण तुम्ही विडोंज कॉम्प्युटरवरही अॅण्ड्रॉईड सहजतेने वापरु शकता. `ब्लुस्टॅक्स` अॅण्ड्रॉईड सॉफ्टवेअर डाऊनलोड केलं की, तुम्ही अॅण्ड्रॉईड इन्स्टॉल करु शकता. तसेच विंडो़ज ऑपरेंटिंग सिस्टमही चालू राहते. पेजमेकर, कोरल ड्रॉ यासारखे प्रोग्राम्सही वापरता येतील. `ब्लुस्टॅक्स` डाऊनलोड करताना जीमेल किंवा गुगलचे अकाऊंट असणे गरजेचे आहे. ते नसेल तर क्रिएट करावे लागेल. तसेच `ब्लुस्टॅक्स` डाऊनलोड होत असतानाच इन्स्टॉल होईल. तुमचं गुगल अकाऊंट लिंक झालं की `ब्लुस्टॅक्स` डाऊनलोड होईल. डाऊनलोड होऊन इन्स्टॉल झालं की `ब्लुस्टॅक्स` स्टार्टमेन्यूमधील न्यू इंन्स्टॉल प्रोग्राममध्ये दिसेल. त्यानंतर तुम्हांला कॉम्प्युटरमध्ये अॅण्ड्रॉईड वापरता येईल. तसेच `ब्लुस्टॅक्स` शिवाय अॅण्ड्रॉईड इम्युलेट अॅण्ड्रॉयड एक्स-८६, अॅण्ड्रॉईड एसडीके यासारखे अॅप्लिकेशन वापरुन कॉम्प्युटर अॅण्ड्रॉईड करता येईल. तुम्हांला व्हॉट्स अॅप कॉम्प्युटरमध्ये वापरायचे असेल, तर गुगल प्ले स्टोअरतून डाऊनलोड करावे. त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर द्यावां लागेल. जर मोबाईल नसेल तर लॅण्डलाइन नंबरही देऊ शकतो. तुम्ही दिलेल्या नंबरवर व्हेरिफिकेशन कोड कॉलने किंवा मॅसेजने येईल. तो कोड टाकला की तुमचे बीबीएम, व्हॉट्सअॅप सुरु होईल.

Monday, 17 March 2014

झाडे लावा


एका दिवसात सामान्यत: माणुस ३ सिलिंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (Oxygen) श्वसन करतो.
एका Oxygen सिलिंडरची सरासरी किंमत रु. ७०० आहे. म्हणजे एका दिवसाला एक माणूस रु. २१०० चा प्राणवायू वापरतो. सबंध वर्षाचा हिशोब करता हि किंमत रु.७,६६,५०० इतकी येते. सरासरी आयुष्य जर ६५ धरले तर हीच किंमत साधारणपणे रु. ५ कोटी इतकी येते. हा प्राणवायू आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडांपासून जवळ जवळ फुकट मिळत असतो. आणि आपण झाडांची कत्तल करीत सुटलो आहोत.                                                झाडे लावा!!! झाडे वाचवा!!! झाडे जगवा!!!

काठी-राजवाडी होळी


काठीच्या होळीला आदिवासी समाजात मोठे स्थान आहे.या होळीला राजवाडी होळी असे संबोधले जाते.सातपुड्यात वसलेले व ऐतिहासिक वारसा लाभलेले काठी संस्थान आजही राजवडी होळीसाठी प्रसिद्ध आहे. सातपुड्यातील आदिवासींचे कुलदैवत राजाफांटा,गांडा ठाकूर यांनी होलिकोत्सवास प्रारंभ केला. त्यानंतर काठी संस्थानचे बाराव्या शतकातील राजे उमेदसिंह यांच्या कारकीर्दीपासून 1246 पासूनची ऐतिहासिक परंपरा आजही टिकून आहे. आजही हा पारंपरिक उत्सव मोठ्या जलोश्यात साजरी केला जातो. या काळात

ढोलाचा आवाज सातपुड्याच्या कानाकोप- यात निनादतो. कुटुंबातील सर्व सदस्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी सात दिवस ब्रह्मचर्याचे पालन करण्यात येते.तसेच शस्त्रपूजन करुण आपले शक्ती प्रदर्शन देखील करता येते होळीच्या दिवशी काठी येथील राजा उमेदसिंह यांच्या सरकारची राजगादीची व शस्त्रास्त्रांची पूजाअर्चा करून गादीची माती कपाळाला लावतात. नर्मदा परिसरातील गुजरात मध्य प्रदेश आदी ठिकाणाहून अबालवृद्ध एकत्र येतात. सर्वप्रथम होळी मातेची पूजा वडाच्या वृक्षाखाली होळी मातेचे भक्त सतीराम महाराज,गोमऱ्या पुजारा यांच्या हस्ते होऊन सगळे ग्रामस्थ एकत्र येऊन ढोलताशांच्या गजरात भोंगऱ्या मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढून येथील हनुमान मंदिर, राम मंदिर, पीरबाबा दर्गा आदी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा विधी केली जातो. तसेच गाव भर सशस्त्र मिरवणूक काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात मेळावासह वाद्यासह मिरवणूक काढून येथील हनुमान मंदिर,राम मंदिर, पीरबाबा दर्गा आदी मंदिरात जाऊन पारंपरिक पद्धतीने पूजा विधी केली जातो. तसेच गाव भर सशस्त्र मिरवणूक काढून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले जाते. आदिवासींच्या संस्कृतीप्रमाणे डोक्याला फेटा, डोळ्यावर चष्मा, कमरेला डोले, हातात तलवार तर महिला गळ्यात चांदीचे दागिने, रंगीबेरंगी साड्या, पायात पैंजण असा साजशृंगार करतात. मोलगी येथील भोंगऱ्या बाजारात काठी संस्थानचे वारस, गावातील पोलिसपाटील, सरपंच, प्रतिष्ठित नागरिक आदींना मान दिला जातो. तसेच जिल्ह्यातील नामांकित लोकानची देखील प्रामुख्याने उपस्थिती असते. त्यात केंद्रीय मंत्री माणिकरावदादा गावीत, माजी मंत्री सुरूपसिंगदादा नाईक, पलाक मंत्री नंदुरबार जिल्हा तथा क्रीड़ा व युवक कल्याण मंत्री महा.राज्य पद्माकरजी वळवी, स्थानिक आमदार के.सी.पाडवी, विधान परिषद् आमदार चंद्रकांत रघुवंशी, तलोदा नगरपालीका प्रतोद भरतभाई माळी, फलोत्पादन मंत्री विजयकुमार गावीत,अक्कलकुवा माजी आमदार नरेंद्र पाडवी, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती उदेसिंगदादा पाडवी, सह स्थानिक विविध पक्ष्यांचे अधिकारी व पदाधिकारी काठीची होळी पाहण्यासाठी आवर्जुन उपस्थित रहातात. तसेच मोलगी येथील भोंगऱ्या बाजारात आदिवासी बांधव हातात तलवार, कुऱ्हाड, भाला, धनुष्यबाण यासह विविध परंपरागत शस्त्रांसह मिरवणुकीत सहभागी होतात. काठीच्या होळीला दांड्याची उंचीचे देखील महत्व लाभले आहे. काठी येथील राजवडी होळीसाठी 70 फूट चीचा बांबूचा दांडा आणला जातो. तो गाडण्यासाठी टिकाव किंवा पावडीचा वापर न करता नवस फेडणारे म्होरके जागा हाताने कोरतात. त्याच ठिकाणी दांडा गाडून रात्री जागरण करून पहाटे पाचला होळी पेटवितात. होळीचा दांडा पूर्वेला झुकल्यास व खाली पडल्यास ते वर्ष सुख-समृद्धीचे जाते, अशी आख्यायिका आहे. होळीच्या दांड्याला जांभूळ, आंब्याची पाने, खोबऱ्याची वाटी, हार-कंगन, खजूर, डाळ्यांचा नैवेद्य चढविला जातो. होळी पेटताच क्षणी सर्व मोरबी बाबा ढाण का डोडे हे सर्वजण होळीच्या आजूबाजूला फेर धरून रामढोलच्या तालावर गोल- गोल फिरून नाचतात काठीच्या होळी उत्सवाला लाख ते दीड लाख आदिवासी बांधव उपस्थित असतात. हा उत्सव पाहण्यासाठी थेट मुंबई, दिल्लीचे नागरिक येतात. चित्रपट निर्माते व दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनीही या ठिकाणी हजेरी लावली होती.ढोलाच्या तालावर रात्रभर साजरी होते होळी हा उत्सव सायंकाळी सुरू होऊन सूर्योदयापर्यंत चालतो. जंगलातून आणलेली लाकडे, गोव- या बांबूभोवती रचतात. सूर्योदयापूर्वी होळी पेटवतात. होळीच्या आधी येणारा हा विशेष बाजार. 10 ते 12 पाड्यांपैकी एका मध्यवर्ती गावात हा बाजार सर्वानुमते भरवतात. प्रत्येक पाड्याचे मुखिया एकत्र येऊन बाजाराचा दिवस ठरवतात. व अश्या आंनद व गुण गौरवाने काठी येथील राजवाडी होळी साजरी करतात